पुरंदर विमानतळ भूसंपादना त बोगस खरेदीखतांचा सुळसुळाट

प्रतिनिधी

पुरंदर, दि. ८ पुरंदर तालुक्यात २०१६ सालापासून छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाची चर्चा आहे. विमानतळ विषय गेल्या आठवण नऊ वर्षात चांगलाचे गाजत आहे. आता कुठे विमानतळ मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली असतानाच यांचव विमानतळाच्या जागेत अनेक बोगस खरेदी खते उघड होऊ लागली आहेत. साधारनपणे २०ते २५अशी बोगस खरेदी खते झाली असल्याची चर्चा आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, उदाचीवाडी, खानवाडी, मुंजवडी या सात गावातून सुमारे २८३२ हेक्टर जमिनीचे भू संपादन करण्यात येणार होते. मात्र स्थानिकांचा विरोध पाहता शासनाने यातील १३८८ हेक्टर क्षेत्र वगळून १२८५ हेक्टर क्षेत्र संपादीत करण्याचा निर्णय घेतला आहे. संपादीत जमिनीसाठी रेडी रेक नरच्या चार पट मूल्य आणि १०टक्के जमिनीचा परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर भू संपादनाला वेग आला असून सुमारे ९३टक्के शेतकऱ्यांनी याला संमती दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, संमती पत्रे देत असताना बोगस खरेदी खते झाल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.
वनपुरी गावातील असेच एक प्रकरण समोर आले असून या संदर्भात सासवड पोलीस ठाण्यात तक्रार ही दाखल झालेली आहे. यात तक्रारदार प्रियाली परदेशीं यांनी २०१८साली वनपुरी येथील गट नंबर २५२ (०. ७५ आर ) आणि गट नंबर २५८( १४. ५० आर )क्षेत्र खरेदी खताद्वारे विकत घेतले होते. या खरेदी खताची रीतसर नोंदणी आणि सातबारे उतारे ही नोंदले गेले होते. मात्र त्यांनी आपल्या जमिनीचे संमती पत्र देताना त्यांच्या जमिनीबाबत दुसऱ्याच व्यक्तीने संमती पत्र दिल्याचे निदर्शनास आले. चौकशी केली असता या दोन्ही गटावरून त्यांची नावे कमी करून दुसरीच नावे चढवण्यात आल्याचे समोर आले. यात संजना लाल प्रसाद (मुंबई ), आदित हिरे (नाशिक )आणि मनोज लोंढे (सोलापूर )यांची नावे चढवण्यात आलेली होती. यात बनावट आधारकार्ड, व पॅनकार्ड बनवून दुसरीच व्यक्ती उभी करून खरेदी खत केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सौ. प्रियाली राकेश परदेशीं यांनी सासवड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली आहे. अशाच प्रकारचे इतर ठिकाणी ही बनावट दस्ताऐवज झाल्याचे समोर येऊ लागले आहे. यात खानवडी येथे ही अशीच दोन फसवणूकीचे प्रकार घडलेले आहेत. यात स्थानिक एजंट, साक्षीदार आणि वकिलांचा सह भाग असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सासवड पोलीस ठाणे आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याचीच चिन्हे आहेत.
याबाबत सासवड शहर भाजपाचे सरचिटणीस मयूर जगताप यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अशा बोगस खरेदी खतांची चौकशी करण्याचे एक स्वतंत्र समिती स्थापन करून आदेश देण्याची विनंती केली आहे.
शासनाच्या या महत्वाकांशी प्रकल्पात राज्यातीलच काही आय ए एस अथवा आय पी एस अधिकारी आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांनीच काळ्याचे पांढरे केल्याची चर्चा सुरु झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page